नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचा निकाल अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना आता अवघ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राजकीय तज्ञांनी आणि माध्यमांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार देशात भाजप कडे जनतेचा कौल असेल असा अंदाज वर्तवला आहे. भाजपला ३०० जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज मध्यमांच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यानंतर आजच्या दिवसाची तसेच या आठवड्याची शेअर बाजाराची सूरूवात चांगली झाल्याचे दिसून आले. आज शेअर बाजार २.४९ टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे निफ्टी सुद्धा २.१५ टक्क्यांनी वधारला.
शेअर बाजारात उसळी
बॉम्बे स्टॉक एक्सेंज ९४६ अंकांनी वधारून ३८,८७७.०१ वर सुरू झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्येही २४७ अकांनी वाढून ११, ६५१. ९० वर सुरु झाला. शुक्रवारी सेंसेक्स ३७,९३०.७७ वर बंद झाला होता, निफ्टी ११, ४०७.१५ वर बंद झाला होता. एक्झिट पोलमधील अंदाज सत्यात उतरल्यास बारारात तेजी दिसून येईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली.
#Sensex opens at – 38,819.68, up by 888.91 points; #Nifty opens at – 11,691.30, up by 284.15 points. pic.twitter.com/8cbTwyniyU
— ANI (@ANI) May 20, 2019
काल सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार विराजमान होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. त्याचा अनुकूल परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे.