मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच सर्वांचे लक्ष वेढलेल्या साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे उदयनराजे यांचा जवळपास ८७ हजार मताने पराभव झाला आहे. अवघ्या चार महिन्यात खासदारीचा राजीनामा दिलेल्या उदयनराजेंना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी जोरदार आव्हान दिल. पाटील यांनी ८७,७१७ एवढ्या प्रचंड मताधिक्याने उदयनराजे यांचा पराभव केला.
मैत्रीपुढे ज्यांनी कशाचीच फिकिर केली नाही असे माझे सवंगडी आणि आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा आज बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये सत्कार करताना खूप समाधान वाटले. यानिमित्ताने आमच्या मैत्रीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. pic.twitter.com/iPpiNK80G7
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 25, 2019
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यानं आणि साताऱ्यात उदयनराजे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे उदयनराजे हे नेहमी प्रचंड मताधिक्याने निवडणून येत होते. मात्र उदयनराजे यांनी भाजपकडून पोटनिवडणूक लढविल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान साताऱ्यातील पोटनिवणुकीच्या प्रचारावेळी शरद पवार यांची प्रचंड रॅली आणि पावसातील सभा सर्वांच्या चर्चेत होती. त्यामुळे देखील राष्ट्रवादीचा विजय मिळाल्याचे बोलले जातआहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला, त्यानंतर ‘मी उद्याच येऊन साताऱ्यातील जनतेचे आभार मानणार आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले, हि माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
परंतु काही कारणास्तव पवारांचा हा सातारा दौरा रद्द झाला, त्यानंतर श्रीनिवा स पाटील स्वतः शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीत आले. त्यांनतर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे श्रीनिवास पाटलांचा सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कारसमारंभ पार पडला.
Visit : Bahujannama.com