अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्या तीन पक्षांनी एकत्र येऊन जास्त जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. लोकं आता नवा पर्याय शोधत आहेत. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर असून ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
देशातील आताची परिस्थिती पहिली तर कुठलाही एक पक्ष पर्याय देऊ शकेल अशी अवस्था नाही. त्यामुळे इतर राज्यातही असं वातावरण आहे. आज लोकं एक पर्याय शोधत आहेत. तो पर्याय कुठला तरी एक पक्ष देईल, अशी अवस्था देशात मुळीच नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असा विश्वास जानकरांच्या मनात आहे आणि त्यादृष्टीने लोक महाराष्ट्राकडे बघत आहेत. बघुया, काय होतंय, असे म्हणत शरद पवारांनी नव्या रणनीतीचे संकेत दिले आहेत.
देशात महाराष्ट्राचा राजकीय पॅटर्न वापरतात की नाही हे माहित नाही. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात काय घडलं आणि शरद पवार यांनी जे केले आहे त्यातून प्रेरणा घेतली असल्याचे त्यांनी म्हटले. असाच विचार सगळ्यांनी करायचे ठरवलं आहे. काल मला ममता बॅनर्जी यांचे पत्र मिळाले आहे. त्यांनी इतर पक्षाबरोबर बैठक बोलावली असल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली आहे.
Visit : bahujannama.com