शरद पवार म्हणाले की, मुंबई पोलिस सुरक्षेसाठी काम करतात हे सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही या लोकांना प्रसिद्धी नाही दिली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे युती सरकार आहे आणि बीएमसी शिवसेनेच्या ताब्यात आहे.
महत्त्वाचे म्हणजे कंगना रनौत आणि शिवसेनेची शाब्दिक लढाई काही तासात अनेक मर्यादा ओलांडून तोडफोडीपर्यंत पोहोचली. कंगना मुंबईत उतरण्यापूर्वीच बीएमसीने तिच्या कार्यालयावर बुलडोजर चालवला. कंगना थेट म्हणाली की, हे पीओके आहे का, माझे कार्यालय माझे राम मंदिर आहे, ज्यावर बाबरने हल्ला केला.
कंगना रनौतने चंदीगडहून मुंबईला उड्डाण केले आणि येथे तिच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला. बघता-बघता बुलडोजरची कारवाई सुरु झाली. पहिले पोलिस व बीएमसीची टीम आली आणि नंतर बुलडोजरने कार्यालय उद्ध्वस्त करण्यास सुरवात केली. विमानात बसलेली कंगना ट्वीटवर ट्विट करत होती आणि तिकडे बीएमसीचा बुलडोजर कारवाई करत होता.
कंगना रनौतच्या थेट लढ्यात जेव्हा महाराष्ट्र सरकारने कंगनाच्या पाली हिलमधील मणिकर्णिका फिल्म्सला हत्यार बनवले, तेव्हा काही तासांतच ही बंडखोरी नव्या मोडवर गेली आणि त्यानंतर कंगनाने तीन शब्दांचे ट्वीट करून प्रकरणाला नवे वळण दिले.
कंगना रनौत म्हणाली की, मणिकर्णिका फिल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्याची घोषणा झाली. ती माझ्यासाठी एक इमारत नाही राम मंदिर आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा स्वत:ची पुनरावृत्ती करेल, राम मंदिर पुन्हा तुटेल, पण बाबर लक्षात ठेव कि हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.