बारामती : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारचा (Sharad Pawar)नकर्तेपणा समोर आला असून सरकारचा नकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम शरद पवार(Sharad Pawar) यांना उरलं आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तुळजापूरमधील गर्वर्न्मेंट सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री घरातून काम करतात यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस यांनी पवार फक्त सरकारचा बचाव करण्याचं काम करत असल्याचा टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टी झालेल्या परिसराचा दौरा करत आहेत. बारामतीमधील उंडवडी गावातील पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. याच्यापूर्वीही असं झालं आहे. आम्ही देखील हे पाहिलं आहे. राज्यपालांबरोबर यापूर्वीही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचं आहे, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं शरद पवारांनी म्हटल्याचे सांगत यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे रोज या सरका रचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे, असे फडणवीस म्हणाले.