बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा चर्चेत अडकलेला असताना अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर तीन दिवसात अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्यानंतर अजित पवारांना झुकते माप का? असा प्रश्न राज्यातील बहुतांश नागरिकांना पडला होता. त्यावर शरद पवार यांनी भूमिका मांडत उलगडा केला आहे.
विधानसभेत अजित पवारांना जाऊन 20-25 वर्षे झालीआहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणूनच काम केले आहे. पाठिशी विधानसभेतील बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असतानाही असा काही विचार कधी त्यांनी केला नाही. उपमुख्यमंत्रीपदाची संधी असताना त्यांनी छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते – पाटील किंवा आर. आर. पाटील यांची नावे सुचवली. स्वतःला संधी असताना त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही. फक्त एक चुकीचे पाऊल रागाच्या परिस्थिती त्यांनी टाकले होते. आताच्या गव्हर्नर साहेबांनी पहाटे उठून शपथ देण्याची तत्परता दाखवली. त्यांच्या लक्षात आल्यानंतर 48 तासांत त्यांनी राजीनामा देऊन चूक सुधारली. त्यानंतर पक्षातील सदस्यांनी एकजीवाने काम करण्याचा आग्रह केला. त्यातून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
अजित पवारांचं वैशिष्ट्ये म्हणजे कष्ट भयंकर करतात. सकाळी सात वाजता त्यांचे कार्यालय सुरू होेते. जास्तीत जास्त लोकांना भेटणे. प्रश्न सोडवणे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे पवारांनी सांगितले.