बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगल्याच लढाया रंगल्या होत्या. एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरूच होते. त्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला होता तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वादविवाद. भाजप पक्षाच्या प्रचारवेळी समोर कुणी पैलवानच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्यावर शरद पवारांनीही आम्ही ‘अशां’सोबत कुस्ती खेळत नाही, असं म्हणत पलटवार केला होता. त्यासंदर्भात आता शरद पवार यांना पत्रकार परिषदेत पुन्हा प्रश्न विचारण्यात आला.
आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना ‘निवडणुकीनंतर तुमची नागपूरच्या पैलवानाशी भेट झाली होती का,’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘आता परत कशाला ते विचारता.’ असे म्हणत शरद पवार यांनी मिश्किल हास्य केले. दरम्यान यावेळी शरद पवार यांनी परतीच्या पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आणि सध्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केलं. यावेळी, परतीच्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आपण दिल्लीत जावून केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. दरम्यान शरद पवार यांनी महाशिवआघाडीसंदर्भात बोलताना म्हणाले की,’ काँग्रेस – राष्ट्रवादी नेहमी धर्मनिरपेक्षतेची कास धरतात. काँग्रेसच्या दिल्लीतल्या प्रतिनिधींशी चर्चा झाली असून किमान समान कार्यक्रमाची चर्चा पूर्ण झाल्यावर विस्ताराने बोलणार आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाले शरद पवार ?
– सरसकट पंचनामे करण्यासाठी आमचा आग्रह
– शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेला का यासाठी प्रयत्न कऱणार
– काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा मुद्दा आहे
– सरकारनं यात लक्ष घालावं
– साठ ते सत्तर टक्के संत्री गळून पडली असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती
– संत्रा, मोसंबी, कपाशीवर पावसाचा परिणाम
– १८ तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक बैठक बोलावण्यासाठी प्रयत्न करू
Visit : bahujannama.com