बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर यावेळी पवारांनी चांगलीच टीपण्णी केली. यावेळी त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पाडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका.
उस्मानाबाद येथील सभेत पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली. यावेळी ते म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणत आहेत कि ही जनादेश यात्रा मी पाच वर्षातील कामाचा हिशेब घेण्यासाठी होत आहे. हिशेब लिहिणे चांगलीच गोष्ट आहे.. . . . . . पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केली. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे राष्ट्र्वादी काँग्रेसची घडी पुन्हा बसविण्यासाठी शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
मी आताच्या नेत्यांसारखे पक्षांतर कधीच केले नाही, उलट मी स्वतः नवीन पक्ष काढला. ज्या नेत्यांनी पक्षांतर केले होते त्यांनी एवढे तरी करून दाखवायचे होते. हि लोक विकासासाठी नव्हे तर ईडी आणि सेबीच्या भीतीने पळत आहेत. ज्या लोकांना ४० वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेत बसविले त्यांना आपल्या भागाचा विकास करून घेता आला नाही, अशा लोकांनाही आम्ही सन्मान दिला त्यांना पहिल्या रांगेत बसविले. आणि आता हे लोक अशा ठिकाणी गेलेत जिथे त्यांना बस म्हटले की बसावे लागते. राणाजगजितसिंह यांना टोला लागवताना ते म्हणाले, स्वतः ला सिंह म्हणवून घेणारेदेखील शहांच्या दर्शनाला गेले.
Visit : bahujannama.com