सांगली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा सांगली विधानसभा मतदारसंघात पराभव झाला असून राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. पवार यांनी या मतदारसंघात आम्ही नाही तर कोणीच नाही, असे सांगली मतदार संघात घडले आहे. हा राजकारणातील ट्रेंड घटक असून ते कोणामुळे घडले यावर मी भाष्य करणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी एकदिलाने लढली का? कार्यकर्त्यांनी ते समजून घेतले पाहिजे, असे म्हटले आहे.
पवार यांनी आज मिरज येथील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात आले असताना ते बोलत होते. पृथ्वीराज यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असताना त्यांना आठ हजार मतांनी हार मिळाली. काँग्रेसच्या आतरंगटबाजीमुळे त्यांचा पराभव झाला, असे बोलले जात होते.
दोन्ही काँग्रेसने काम केले असते तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पराभव झाला नसता. सांगली मतदारसंघातही तेच झाले. येथील काही लोकांना वाटले की, आम्ही नाही तर दुसर कोणीच नाही. राजकारणात असा ट्रेंड चालत नाही. कार्यकर्त्यांनी समजून घेत त्यात सुधारणा केली पाहिजे. नाहीतर पक्ष अडचणीत येतील. सांगली मतदारसंघात हे कोणामुळे झाले याचे भाष्य करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
कार्यक्रमावेळी शरद पवार यांच्या टीकेची चर्चा चालली होती. शरद पवार बोलत होते तेव्हा त्यांचा रोख वसंतदादा पाटील यांच्या वारासदारांवर होता.