बहुजननामा ऑनलाईन : राज्यात जो निकाल आला तो लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शरद पवार आणि माझे वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी विधानसभा निवणुकीच्या वेळी केलेले काम ते खरेच कौतूक करण्यासारखे आहे. तरूणादेखील लाजवेल असा त्यांनी प्रचार केला. आपल्या उमेदवारासाठी आणि पक्षासाठी त्यांचा भर पावसातील प्रचार मनाला भावणारा आहे. त्यांनी पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. अश्या वेळीही त्यांनी विरोध कायम ठेवला. शरद पवार यांच्या ध्येय वेड्या प्रचाराने संपूर्ण राज्यांत त्यांचे कौतुक केले आहे.असे ध्येयाने पछाडलेले कार्यकर्तेच लोकशाही मजबूत करू शकतात. अश्या शब्दात अण्णा हजारे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे.
तसेच अण्णा हजारे यांनी यावेळी पक्षांतर केलेल्यांना उड्या मारणाऱ्या माकडांची उपमा देत म्हणाले कि, वैयक्तिक कारणासाठी किंवा एखादा पक्ष वाईट वेळेतून जात आहे , म्हणून त्या पक्षाची साथ सोडून जाणे योग्य नाही. अनेक लोकांनी पक्षांतर करून माकड उड्या घेतल्या, इकडून तिकडे गेले. हे सर्व स्वार्थी राजकारण आहेत. परंतु जनतेने अशांना चांगलाच धडा शिकवला आहे. उड्या मारणाऱ्या १७ आमदारांना त्यांनी घरी बसविले, माझ्या दृष्टीने हे सर्वात महत्वाचे आहे.
महायुतीच्या जगांत झालेली घट यासंदर्भात विचारले असता हजारे म्हणले कि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरी काम केले असले तरी त्यांचे मंत्री आणि कार्यकर्ते जनतेच्या संपर्कात नाहीत. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली , आमच्यासारखे आम्हीच, आम्हाला कोणीच हरवू शकत नाहीअसे त्यांना वाटत होते. तसेच विरोधी पक्ष नाहीसा झाला आहे, अशी त्यांची भावना झाली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला फटका बसला, आणि त्यांच्या जागा घटल्या. असे त्यांनी सांगितले.
दरम्यान , नेत्यांची पक्षांतर थांबविण्यासाठी ‘नोटा’ ऐवजी ‘वरील उमेदवार पसंत नाही, हा पर्याय देऊन त्याला एक चिन्ह देखील दिले पाहिजे. त्यामुळे जर त्या चिन्हाला जास्त मते मिळाली तर फेरनिवडणूक घ्यायला हवी. आणि त्या नेत्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी द्यायला नाही पाहिजे. तसेच पक्ष किंवा उमेदवार जे जाहीरनामे , वचननामे काढतात ते न पाळण्यास त्यांची तिकीट कापण्यात यावी असेही अण्णा हजारे यांनी सुचविले.