बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल लागून २० दिवस झाले, आद्यपही सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकरात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांत खलबतं सुरू आहेत. भाजपपासून दूर गेलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मदतीचा हाथ पुढे केला आहे. परंतु या महाशिवआघाडीतही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरू शकलेला नाही.
या पार्श्वभूमीवरच महाशिवआघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसात होत असलेल्या या बैठकीत समान कृती कार्यक्रम आणि पद व जबाबदारीचे वाटप याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, ‘राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आल्यास त्या सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद गेल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कसलीच अडचण नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रथम राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर काल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही पक्ष एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम निश्चित करतील आणि सत्तेचा वाटा कसा असेल हे देखील निश्चित करणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी रुग्णालयातून बाहेर येताच सेनेचाच मुख्यमंत्री होईल असे पुन्हा एकदा स्पष्ट केले होते.
Visit : bahujannama.com