नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाहीन बागचा मुद्दा प्रसिद्धीच्या झोतात आहे. यावर मोठे राजकारणही सुरू आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात 48 दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. अजूनही हे आंदोलन थांबलेले नाही. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथीला येथील आंदोलनकर्त्या महिलांनी गांधीजींचा मास्क चेहर्यावर लावून त्यांचे स्मरण केले.
धरणे आंदोलन करणार्या महिलांनी महात्मा गांधीजींचे मोठे मोठे मास्क आपल्या चेहर्यावर लावले आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनातून शांतीचा संदेश दिला. या ठिकाणी महिलांनी गांधीजीेंचे स्मरण करण्यासाठी एक नाटकसुद्धा सादर केले. येथील महिलांनी म्हटले आहे की, आम्ही केवळ संसदेतील गोष्टींवरच विश्वास ठेऊ.
गल्ली-बोळात केलेल्या वक्तव्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. गृहमंत्री म्हणतात एनआरसी जरूर आणणार, तर पीएम मोदी म्हणतात, एनआरसीवर त्यांच्या सरकारने कोणतीही चर्चाच केलेली नाही. अशा स्थितीत त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा. महिलांनी हे सुद्धा म्हटले की, पीएमने राष्ट्रासाठी संदेश द्यावा की, आम्ही सीएए-एनआरसी मागे घेत आहोत. सरकारने शाहीन बागमध्ये आपला प्रतिनिधी पाठवून कायदा परत घेत असल्याचे सांगावे. एका महिलेने सांगितले, मोदी-शाह यांच्यामध्येच समन्वय नाही. यासाठी त्यांची वक्तव्य वेगवेगळी आहेत आणि यामुळे आम्हाला विश्वास नाही.