बहुजननामा ऑनलाईन- केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी कंपन्यांना टॅक्समध्ये मोठी सूट देण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेअर मार्केटमधील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE १,८४४. ६३ अंकाने वाढून ३७,९२९. ८९ अंकावर पोहोचला आहे. तसेच NSE मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हि वाढ ५२५. ३५ वरून ११,२३०. १५ अंकावर थांबली आहे. सेन्सेक्समध्ये मागील दहा वर्षांमधील सर्वात जास्त वाढ आढळून आली आहे. अर्थमंत्र्यानी आज झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कॉर्पोरेट कंपन्यांवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता या कंपन्यांवर केवळ २२ टक्के टॅक्स लागणार आहे.
५.८२ लाख कोटी रुपयांचा फायदा
गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे मोठा फायदा झाला असून जवळपास ५.८२ लाख कोटी रुपयांचा सर्वांना फायदा झाला आहे . हा फायदा कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे आहे.
कॅपिटल सिंडिकेटचे मॅनेजिंग डायरेक्टर सुब्रमण्यम पशुपति यांनी बोलताना सांगितले की, कंपन्या अनेक कालावधीपासून मिनिमम अल्टरनेट टॅक्स हटवण्याची मागणी करत आहे. त्यामुळे या टॅक्स आणि करामध्ये घट आल्याने कॉर्पोरेट कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व घडामोडीमुळेच शेअर बाजारात तेजी आलेली आहे.
Visit : bahujannama.com