मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसला असून यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचं गणित बिघडलं आहे. अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी यंदाच्या वर्षी शाळांनी फी वाढ करू नये, असा निर्णय शिक्षण विभाग लवकरच जारी करणार आहे.
राज्या बोर्डाच्या शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी बोर्डाच्या शांळांनाही फी वाढ करू नये, यासाठी बोर्डाच्या अध्यक्षांशी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड स्वत: चर्चा करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडॉऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक पालकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अशा पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन यंदा राज्यातील शाळांनी फी वाढ करू नये अशी शिक्षण विभागाने भूमिका घेतली आहे. त्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत शिक्षण विभाग निर्णय जारी करणार आहे.
माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांना फी वाढीसंदर्भात पत्र लिहले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी. उलट फीमध्ये कमीतकमी 10 टक्के सूट द्यावी, अशी विनंती आमदार शेलार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.
एनपीन्यूज24 नेटवर्क