मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जलयुक्त शिवार या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत १३०० कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना घोटाळा झाला असल्याचे ते म्हणाले तर या प्रकरणाची चौकशीही जलसंधारण विभागातर्फे सुरु असल्याचे सांगितले.
सरकारला विधानपरिषदेचे विरोधी पश्र नेते धनंजय मुंडे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जलयुक्त शिवार प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन ब्युरो मार्फत करण्याची मागणी केली. तांत्रिक गुंतागुतीमुळे ही मागणी मान्य करता येऊ शकत नसल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. मात्र भूतकाळात अशा प्रकरणाची चौकशी २ स्वतंत्र संस्थआंद्वारे करण्यात आली असल्याची आठवण विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी करून दिली. सरकारला याबाबत आपले पावसाळी अधिवेशन संपण्याआधी देण्यास सांगितले.