बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवंगत पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी देशास ‘कृषीप्रधान व आत्मनिर्भर’ बनवणाऱ्या’ अन्नदाता बळीराजा शेतकऱ्या विषयी (Gopaldada Tiwari)व सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानां विषयी गौरवपर ‘जय जवान – जय किसान’चा नारा देशवासीयांना दिला होता..! एक काळ जेंव्हा भारतात अन्नधान्याचा तुटवडा होता त्या काळी अमेरीकेचा मिलो देशवासियांना खावा लागत होता व अन्न तुटवड्या मुळे प्रती सोमवार उपवास वा भात न खाण्याचे आवाहन तत्कालीन पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना केले होते.. स्व शास्त्रीजींनी “बळीराजा – शेतकऱ्याचा आत्मसन्मान वाढवून त्यास प्रेरीत करण्याची” महत्वाची भूमिका, देशाचे ‘प्रमुख नेतृत्व’ या नात्याने केली होती..! परंतू आज मात्र देशास अन्नधान्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवणार्ऱ्या शेतकऱ्यास’ परावलंबी बनवण्याचे व खच्चीकरण करण्याचे सत्तापक्षाचे चाललेले प्रयत्न काँग्रेस ऊधड्या डोळ्याने पहात बघ्याची भूमिका घेणार नाही तर देशाचा कणा असलेल्या बळीराजास वाचवण्यासाठी त्याच्या मागे खंबीरपणाने ऊभी राहील व हीच खरी स्व शास्त्री जी यांना श्रध्दांजली ठरेल असे ऊदगार काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे स्व शास्त्री जींच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन – श्रध्दांजली कार्यक्रमात केले.
समिती सदस्य भोला वांजळे यांनी १९८९ मध्ये मा गोपाळदादा तिवारी यांनी स्व शास्त्रीजीं चा पुतळा बसवण्यात पुढाकार घेऊन तत्कालीन महापौर ॲड अंकुशजी काकडे यांना सुपुर्त केला असल्याचे सांगून, पुतळ्याची मुळ कोनशीला मनपाने तातडीने बसवण्याची मागणी देखील केली.. या प्रसंगी स्व शास्त्रीजी व दिवंगत नगरसेवक महेश लडकत यांना ‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे श्रध्दांजली वहाण्यात आली. या प्रसंगी सर्वश्री योगेश भोकरे, महेश अंबिके, अशोक काळे, संजय अभंग, आशीष गुंजाळ, पै शंकर शिर्के, देवराम इंदूलकर, वाघोले काका, ललित अगावणे, उदय लेले, नरेश आवटे इ उपस्थित होते.