सातारा : बहुजननामा ऑनलाईन – उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. अमित शहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीज महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील असं त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं. परंतु मोदी यावेळी कुठेच दिसले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी यामागील कारण स्पष्ट केले आहे.
Day 20 Interacting with media on #MahaJanadeshYatra in Karad #महाजनादेशयात्रा https://t.co/chHe04ZEmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2019
साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. राजकीय प्रवेशाच्या कार्यक्रमांना पंतप्रधान कधीही उपस्थित रहात नाहीत. यासंदर्भात तसा प्रोटोकॉल आहे. या कारणामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशाला हजर राहू शकले नाहीत. असे असले तरी मोदींनी राजेंना भेटायला बोलावलं आहे. जरी ही भेट झाली नाही तरी 19 सप्टेबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार आहेत. येथे पंतप्रधान मोदी आणि उदयनराजेंची भेट होईल.”
Apologies and Big Thank you to Karad!
Despite being late by 4.30 hours, you showed your firm commitment and support to development !!!#MahaJanadeshYatra pic.twitter.com/OJC88loYNC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 15, 2019
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शरद पवारांनी केलेल्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली. मु्ख्यमंत्री म्हणाले की, “पवार साहेब मोठे नेते आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की, पाकिस्तानला होतो. मतांसाठी असं वक्तव्य करणं ही गोष्ट योग्य नाही.”