मुंबई : बहुजननामा टीम –विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीपासून ते शिवसेना सत्तेवर येईपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे ट्विटर वॉर सगळ्यांनीच पहिले आहे. आपल्या प्रत्येक ट्विट मधून संजय राऊत भाजपला सूचक इशारा देत आले आहेत. आता शिवसेना,काँग्रेस,राष्टवादी यांच महाविकासआघाडीच सरकार सत्तेत आलं तरी संजय राऊत यांच ‘ट्वीटवॉर’ सुरूच अजून सुरूच आहे. आजसुद्धा संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.
‘तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं..’ असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मधून भाजपच्या कोणत्या नेत्यावर टीका केली याबाबत राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.
तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं..
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 26, 2019
राणेंच्या पैशाला खुनाचा वास
कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणेंबरोबरच भाजपच्या अनेक नेत्यांवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या पैशांना खंडणीचा, खुनाचा वास असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. तर दीपक केसरकरांच्या या टीकेला प्रतीउत्तर म्हणून केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला आहे.
Visit : bahujannama.com