नागपूर : बहुजननामा ऑनलाइन– ठाकरे सरकारने (Thackeray government) औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) केलं, उस्मानाबादचं (Osmanabad) धाराशिव (Dharashiv) केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव दिलंय, हे निर्णय रद्द केले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे हे सिद्ध झालंय. औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता यासाठी भाजप (BJP) विचारत होती. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्ववादी भुमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाही अशा शब्दात शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले, या निर्णयांना स्थगिती का दिली हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नसल्याची टीका राऊत यांनी केली. राजकीय, आर्थिक, बुलेट ट्रेन, आरेचा विषय हे आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला ? निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
हे सरकार गोंधळलेले
दि. बा. पाटील याचं नाव देण्याचा निर्णय हा लोकभावनेचा आदर म्हणून निर्णय घेतला होता.
हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) टांगती तलवार आहे.
स्थगिती, स्थगिती असं शिंदे भाजप सरकारचं सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शरद पवार (Sharad Pawar) आणि मी ठरवून एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, अशा बातम्या तुम्ही चालवू शकता.
शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालं आहे, मी त्यांची भेट घेईन, असंही ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात. महाराष्ट्रात बऱ्याच गमती जमती पाहायला मिळतात.
खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची वेगळ्या विदर्भाची भूमिका जुनीच असून काँग्रेस (Congress) आमच्यासोबत आहे.
महाराष्ट्रात घटनाबाह्य घटना घडत आहेत. महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना राज्यपालांना (Governor) घटना आणि कायद्याची चाड होती.
आता त्यांनी घटना समुद्रात नेऊन बुडवली का हे पहावं लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Web Title :- Sanjay Raut | shivsena mp and leader sanjay raut slam eknath shinde and devendra fadnavis for stay name change decision aurangabad and osmanabad
हे देखील वाचा :
Pune Rains Update | पुण्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिपद न मिळाल्यास शिंदे गटात बंडखोरी होईल, शिवसेना खासदाराचा दावा