मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही. अशात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओकमध्ये राऊत आणि पवार यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली. यानंतर पवारांनी माध्यमांशी बोलणे मात्र टाळले. आता राऊत आणि पवार यांची भेट राज्याला नवीन सत्ता समीकरण देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माध्यमांनी राऊतांशी संवाद साधला असता महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर आमची चर्चा झाली असे सांगितले. याशिवाय पवारांनी राज्यातील अस्थिर राजकीय वातावरणावर चिंता व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेबाबत प्रश्न विचारले असता मात्र राऊत यांनी काहीही बोलणे टाळले. राऊत आणि पवार यांच्यातील ही काही पहिलीच भेट नाही. 31 ऑक्टोबर रोजी राऊतांनी पवारांची भेट घेतली होती. तेव्हा दिवाळीनिमित्त ही भेट झाल्याचे राऊतांनी म्हटले होते.
सध्या जनतेचं लक्ष राज्यातील सत्ता स्थापनेकडे आहे. राज्यात युतीचे सरकार येते की, नवीन सत्ता समीकरण पाहायला मिळते अशी उत्सुकता सर्वांमध्ये दिसत आहे. सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यासाठी भाजपला शिवसेनेची सहायता घ्यावी लागणार आहे. असे सर्व असताना आगामी 48 तासांत राज्यात सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे.
Visit : Policenama.com
- भिजवलेले बदाम नियमित सेवन केल्यास होतील ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे
- लग्न करण्याचेही ‘हे’ 5 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या
- नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- नेहमी ताजेतवाने, उत्साहित राहण्यासाठी ‘या’ 9 गोष्टींची काळजी घ्या
- निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या
- मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या