मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रचे राजकारण दररोज वेगळे वळण घेत आहे. ‘100 कोटी रुपयांच्या वसूली कांड’च्या आरोपावरून भारतीय जनता पार्टी लागोपाठ उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि एनसीपीच्या समोर सरकारची प्रतिमा बिघडत असल्याने संकट उभे राहिले आहे. परंतु, हे सर्व असतानाच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत एक मेजवानी देत आहेत, जी विशेष आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी आपल्या घरी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या डिनरमध्ये महाराष्ट्रातील सर्व खासदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी प्रसिध्द गायिकेची संगीत मैफिल देखील होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
विशेष म्हणजे संजय राऊत यांच्याकडून काँग्रेस, शिवसेना, एनसीपीच्या खासदारांसह महाराष्ट्रातील भाजपा खासदारांना सुद्धा आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, हे सुद्धा महत्वाचे आहे की, महाराष्ट्रात अचानक आलेल्या राजकीय वादळापूर्वीच हा भोजन कार्यक्रम ठरलेला होता.
एकीकडे भाजपा रस्त्यापासून संसदेपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला घेरत आहे, तर दुसरीकडे आता संजय राऊत यांच्या या भोजन कार्यक्रमात त्यांचे खासदार हजर राहणार आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतून शंभर कोटी रूपयांच्या वसूलीचे टार्गेट दिले होते. यानंतरच भाजपाने लागोपाठ ठाकरे सरकारवर हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ट्रान्सफर-पोस्टिंगचे रॅकेट सुरू असल्याचासुद्धा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत दिल्लीमध्ये गृह सचिवांची भेट घेतली आणि सीबीआय चौकशीचे आवाहन केले. तर, मुंबईमध्ये सुद्धा बुधवारी भाजपाचे एक प्रतिनिधी मंडळ राज्यपालांना भेटले आणि संपूर्ण वादावर अॅक्शन घेण्याची मागणी केली.