बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांमध्ये अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून शाब्दिक युद्धच पेटले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबामध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून टीका केली आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, भाजपवर निशाणा साधत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाही, तर श्राद्ध घाल, अशा शब्दांमध्ये सोमय्या यांना सुनावले आहे.
राऊत(Sanjay Raut) यांनी ट्विट केले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाही, तर श्राद्ध घाल. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र.
अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2020
सोमय्यांनी काय म्हटले आहे ?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रेही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे. 21 सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. काहीही संबंध नसणारी दोन कुटुंबे एकत्र येतात आणि जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपल्या पत्नीचे नाव देतात, याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे. मी पण महाराष्ट्र्चाचा एक नागरिक आहे तर मला समजवून सांगणार का? दोन्ही कुटुंब एकत्र येण्यामागचे प्रायोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही, तर मुख्यमंत्री आहात म्हणून हे प्रश्न विचार आहोत, असेही ते म्हणाले होते.