बहुजननामा ऑनलाइन टीम – माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेफन्द्र फडणवीस( Gopichand Padalkar) यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय नुकताच ठाकरे सरकारने घेतला आहे. यावर भाजप आणि महविकास आघाडी सरकारात टीका टिपणी सुरु आहे. या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकर यानी राज्य सरकारवर टीका केली आहे. पडळकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता महाविकास आघाडी सरकारला खुपत आहे. त्यामुळे आकस बुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत. त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे. असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना लगावला आहे.
पडळकर म्हणाले की, देवेंद्रजींच्या सोबत या महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब, जनतेचे आशीर्वाद आहेत. आणि तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही. उलट जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत. त्यांची सुरक्षा आधी काढावी. महाविकास आघाडी कपटनीतीने व सूडबुद्धीने हा निर्णय घेतय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय असा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीला यांनी केला.