बहुजननामा ऑनलाइन टीम – तासगाव येथील बेंद्री या गावचे चे सुपुत्र, जवान सचिन जाधव हे आंध्र प्रदेश येथील चित्तूर येथे झालेल्या अपघातात ठार (jawan)झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि.९) रोजी रात्रीच्या सुमारास झाला आहे. सचिन जाधव (वय ३०) हे आयटीबीपी ५३ बटालियनचे जवान होते. सचिन जाधव यांचे पार्थिव आज दुपारपर्यंत आणण्यात येणार आहे. दुपारनंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे. जवान सचिन जाधव यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
तासगाव येतील बेंद्री गावात सचिन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १२ वी पर्यंतचे शिक्षण तासगाव येथील महाविद्यालयात घेतले. यानंतर देशसेवेसाठी २०१० मध्ये भरती झाले. सध्या ते आयटीबीपी ५३ बटालियन, चित्तूर आंध्रप्रदेश येथे कार्यरत होते. ६ वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना तीन एक वर्षाचा मुलगा आहे. तर महिन्याभरापूर्वी कन्यारत्न झाले आहे. या कन्येच्या नामकरण विधीसाठी आंध्रप्रदेशहून गावाकडे निघाले होते. येताना झालेल्या अपघातात ते ठार झाले.