सांगली / इस्लामपूर : बहुजननामा ऑनलाइन – Sangli News | सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) येथील राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आणि उद्योजक आनंदराव दत्तू पाटील (वय, 57) यांचे सोमवारी (26 जुलै) रोजी येथे अपघाती (Accident) निधन झाले (Sangli News) आहे. त्यांच्या वाघवाडी रस्त्यावरील घरासमोरच चारचाकी गाडीने त्यांना जोराची धडक दिल्याने हा घाट झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांचे ते नातेवाईक होत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीनुसार, इस्लामपूर नजीक वाघवाडी रस्त्यावरील (Waghwadi Road) घरासमोरच चारचाकी गाडीने आनंदराव पाटील यांना जोराची धडक दिली.
हा अपघात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
जखमी अवस्थेत त्यांना येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
परंतु, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आणि उद्योजक आनंदराव पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच रेठरे धरण येथील ग्रामस्थांनी तसेच राजारामबापू उद्योग समूहातील पदाधीका-यांनी रुग्णालय ठिकाणी धाव घेतली. म्हणून या ठिकणी मोठा जमाव झाला होता.
Web Title :- Sangli News | Anandrao Patil, director of Rajarambapu factory in Islampur, died in an accident
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज