औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – आत्तापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूरच राहिलेली सामाजिक प्रश्नांवर काम करणारी संघटना संभाजी ब्रिगेड यावेळी मात्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून त्यांनी आपल्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने राज्यभरात आत्तापर्यंत ५० उमेदवार घोषित करण्यात आले असून यातील १५ उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली.
कोण आहेत उमेदवार :
संभाजी ब्रिगेडचे डॉ. भानुसे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली असून यात विनोद शिवाजी जगताप (बारामती, जि. पुणे), जीवन बापू शेवाळे (पुरंदर, जि.पुणे), संतोष बालासाहेब शिंदे (पर्वती, जि. पुणे), शिवाजी उत्तम पवार (हडपसर जि. पुणे), राहुल मारोती वायकर (बीड, जि.बीड), रणजित भुपेंद्र तिडके (अमरावती), विशाल दत्ता शिंदे (किनवट- माहूर, जि. नांदेड), सोनाली उमेश ससाने (कोथरुड, जि. पुणे), चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे (शिरूर हवेली, जि. पुणे), प्रशांत राजेंद्र पवार (इंदापूर जि.पुणे), , रमीज रशीद मुजावर (कागल, जि. कोल्हापूर), प्रकाश रायभान पारखे (वडगाव शेरी, जि. पुणे), राजू गुलाबराव मोरे (परतूर – मंठा, जि. जालना), तौसिफ अब्बास शेख (कसबा, जि.पुणे),डॉ. नीता अशिष पाटील (कल्याण पश्चिम, मुंबई) यांचा समावेश आहे. यावेळी पत्रकार परिषदेस राहुल भोसले, राम भगुरे, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, बाळासाहेब दाभाडे, रेखा वहाटुळे, रवींद्र वहाटुळे, अॅड. अविनाश औटे, इत्यादी उपस्थित होते.
स्पष्ट केली भूमिका :
यावेळी भानुसे यांनी माहिती दिली की आगामी निवडणुकीत शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्यावर आमचा भर असणार आहे. तसेच निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन हे चिन्ह मिळाल्याने त्याच चिन्हावर आमचे उमेदवार लढतील. तसेच केवळ सामाजिक प्रश्नांवर आंदोलने करून चालणार नाही, त्यासाठी सत्ता हवी, यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com