अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – चर्मकार समाजातील २२ कर्तबगार महिलांना संत रविदास महिला समाजभूषण पुरस्कार जाहीर झाले असून, रविवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, गुलमोहर रोड येथे पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व सचिव सुभाष चिंधे यांनी दिली.
सौ. इंदूबाई नन्नवरे (खरडगाव ता. शेवगाव) यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, शाल व रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चर्मकार समाजातील सीताबाई दुर्गे, उर्मिला तेलोरे, कृष्णाबाई देशमुख (अहमदनगर), सुमन धस (श्रीरामपूर), रंजना उदमले (कर्जत), नर्मदा पोटे (पारनेर), सकूबाई साळवे (श्रीगोंदा), जनाबाई उदमले (पाथर्डी), लक्ष्मीबाई कानडे (नेवासा), चंद्रभागा तुपे (श्रीरामपूर), संजया उदमले (शिर्डी), लक्ष्मीबाई सोनावणे (राहाता), रंजना वाघमारे (शेवगाव), लतिका सातपुते (जामखेड), रंजना बारसे (कोपरगाव), संगीता वाघचौरे, रुक्मिणीबाई अभंग (संगमनेर), सिंधुबाई ठोकळे (राहुरी), कलावती घोलप (अकोले), सुमनबाई कांबळे (वांबोरी) आदी महिलांची संत रविदास महिला समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते व आ.अरुण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास खासदार सदाशिव लोखंडे, आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आशाताई मराठे, जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित राहणार आहेत. चर्मकार समाज बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.