मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तत्कालीन क्राईम ब्रांचचे API सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. वाझे यांची बदली नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आली. तर त्यांच्या बदलीच्या वृत्ताला गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. बदलीनंतर सचिन वाझे यांनी क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावरून सचिन वाझे यांची बदलीची घोषणा गृहमंत्र्यांनी सभागृहात दिली होती. त्यामुळे वाझे यांची आता कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा प्रश्नही विरोधकांकडून उपस्थित होत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला मागे पाऊल ठेवत सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
वाझेंची एटीएस कडून १० तास चौकशी –
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं अडचणीत सापडलेले वाझे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अनेक आरोप होत होते. तर यांची एटीएसने तब्बल १० तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ कार वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी ATS ला दिली. महाराष्ट्र ATS मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी वाझे यांचे नाव चर्चेत आले आहे. तर या सर्व आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले असल्याचे समजते.