बहुजननामा ऑनलाईन – भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करत ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं होतं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सामनाचे संपादक सचिन वाझे यांचा बचाव करत आहेत असा दावा नितेश राणे यांनी केला होता. या आरोपानंर वरुण सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत राणे कुटुंबावर निशाणा साधत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. यावर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत हेते.
‘आमच्यावर खालच्या पातळीचे आरोप केल्यास तुमची सर्व अंडीपिल्ली बाहेर काढू’
नितेश राणे म्हणाले, तुम्ही तुमच्याकडे असलेली खरी माहिती तपास यंत्रणेकडे पोहोचवाल तर आम्ही तुमच्याविरुद्ध नोटीस काढून तुमच्यावर कोर्टाचा दबाव टाकू असा धमकावण्याचा प्रयत्न आहे. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीचे आरोप केले तर तुमची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू असं त्यांनी सांगितलं.
‘आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल तर रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल…’
पुढं बोलताना राणे म्हणाले, पार्श्वभूमी कुणाला सांगताय, आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरेंची सेवा करत होतो. त्यामुळं आम्हाला सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल आणि रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल, नंदकुमार चुतर्वेदी असे अनेक विषय बाहेर काढायची तयारी असेल तर पाठवा आम्हाला कायदेशीर नोटीस, पुन्हा अशी एक पत्रकार परिषद घेत सगळं बाहेर काढेन, त्यामुळं आम्हाला धमकी देऊ नये असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सरदेसाईंना दिला आहे.
‘लग्न जमत नसेल तर शादी डॉटकॉमवर जा’
नितेश राणे म्हणाले, लग्न जमत नसेल तर शादी डॉटकॉमवर जा, बायोडाटा पत्रकार परिषदेत घेऊन सांगायचा असतो का ? आमच्या कुटुंबाबद्दल जे खालच्या पातळीचे आरोप केलेत, ते पुन्हा करू नयेत. राज्याविरोधात अशी कृत्य करत असाल आणि त्याच्याविरोधात विरोधी पक्ष म्हणून भाजपनं बोलायचं नाही हे आम्हाला जमणार नाही. जी सध्या परिस्थिती आहे ती आम्ही मांडली आहे. तपास यंत्रणेनं विचारलं तर ही खरी माहिती आम्ही त्यांना देणारच आहे. उगाच आरोप करणं, टाईमपास करणं यापेक्षा मनसुख हिरेन, सचिन वाझे प्रकरणात सत्य बाहेर आलं पाहिजे असं म्हणत त्यांनी सरदेसाईंना फटकारलं.
‘म्हणून पोलीस संरक्षण मिळालं असावं’
नितेश रणे असंही म्हणाले, टेंडरसाठी अधिकाऱ्यांना त्रास दिला जातो, फोन केले जातात, आमदारांवर दबाव टाकला जातो. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यांना संरक्षण दिलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.