बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांतग समाजाची निव्वळ फसवणूक करत आहेत. सत्ता मिळाल्यापासून ते महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करुन सामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत. अशा भावना लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांचे नातू मानवहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त 100 कोटीं रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. पण त्यातील 100 रुपये देखील मिळाले नाहीत.
मातंग समाजाच्या जनतेला त्यांनी आश्वासनांच गाजर दाखविले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून मातंग समाजाला फक्त गृहीत धरुन अण्णासाहेब साठे यांच्या नावाखाली मांतग समाजाची मते मिळविली आहेत. ते महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करुन मतांचं राजकारण करत आहे, असा आरोपही साठे यांनी केला आहे. मुख्यंमंत्र्यांनी मातंग समाजाला सत्तेतील वाटा दिलाच नाही. त्यांच्या या फसवणूकीला येत्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ, असा इशारा साठे यांनी दिला आहे. सरकारने अण्णा भाऊच्या नावाने १ ऑगस्टला टपाल तिकीटाची घोषणा केली. अद्याप ही तिकीटे पोस्टात पाहायला मिळली नाही.
अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त शंभर कोटी रुपयांच्या केलेल्या घोषणेबाबत कोण काम करत आहे. याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. या सर्व गोष्टी निवडणुकांच्या तोंडावर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री मातंग समाजाची फसवणूक करत आहेत. अण्णाभाऊंच्या जन्मगावी 100 कोटींमधील शंभर रुपये देखील अद्याप मिळाले नाहीत. मोठमोठ्या घोषणा करुन सरकार सामान्य जनतेसोबत मतांच राजकारण करत आहे. त्या विरोधात मी राज्यभर जनजागृती अभियान राबवत आहे. या फसवणुकीचा निषेध करत येत्या निवडणुकीत नक्कीच बदला घेऊ, असा इशारा सचिन भाऊ साठे यांनी दिला आहे.