बेंगळुरू : वृत्तसंस्था – देशात एकीकडे CAA आणि NRC कायद्यावरून वादळ उठले असताना त्यावरून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जात आहेत. अशातच आता भारतीय संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेड्कर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खळबळजनक आरोप केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे आणि याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ते कर्नाटक येथील एका सभेमध्ये बोलत होते.
#WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar's great-grandson, in K'taka: …I'd said RSS is India's terrorist org,get it banned…A sadhvi sits beside PM&says that when Indian Army exhausted its arms&ammunition,RSS provided them that. How did RSS get that arms&ammunition?…(26.01) pic.twitter.com/PMmtLX2afc
— ANI (@ANI) January 27, 2020
यावेळी बोलताना त्यांनी भाजप साकारवर निशाणा साधत आपल्या पाकिस्तानमधील भाषणाचा हवाला दिला ते म्हणाले , तेथे मी म्हटले होते की आरएसएस भारतातील अतिरेकी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणा. माझ्याकडे पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुला साध्वी बसलेली आहे. ती मुलाखतीत सांगते की, जेव्हा भारतीय सैन्याकडील दारुगोळा, बंदुका संपल्या, तेव्हा आरएसएसने त्यांना ती पुरविली. पंतप्रधानांच्या बाजुला बसलेली साध्वी अशा प्रकारचे वक्तव्य करते. आरएसएसकडे एवढे बॉम्ब कसे आणि कुठून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका कुठून आल्या, असा प्रश्न त्यांनी विचारला.
संघटनेवर जागतिक बंदी आणण्याची गरज …
ज्या घरात बॉम्ब सापडला ते घर किंवा घरातील मुलगा दहशतवादी ठरत नाही का. मग जर या संघटनेकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा असेल तर ही संघटना दहशतवादी नाही का होत, असा आरोप राजरत्न यांनी केला. या संघटनेचे लोक आज दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनेवर जागतिक बंदी आणण्याची गरज आहे. ते काम आम्ही करत आहोत, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com