नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे झारखंडची राजधानी रांची येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर एक मोठे विधान केले आहे. त्यांनी राष्ट्रवाद सारख्या शब्दात नाझी आणि हिटलरची झलक दिसत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान भारताला विश्वगुरू बनवायचे लक्ष असून आरएसएसचा विस्तार देशात होणार असल्याचेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. राष्ट्रवाद सारखा शब्द वापरला नाही पाहिजे. त्यामुळे त्याचा अर्थ नाझी किंवा हिटलर असा होऊ शकतो. अशात राष्ट्र किंवा राष्ट्रीय सारख्या शब्द ठळकपणे वापरायला पाहिजे, असे भागवत म्हणाले. तसेच जगासमोर आत्ता इसिस, कट्टरतावाद आणि हवामान बदलासारखे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
#WATCH Ranchi: RSS chief recounts his conversation with an RSS worker in UK where he said "…'nationalism' shabd ka upyog mat kijiye. Nation kahenge chalega,national kahenge chalega,nationality kahenge chalgea,nationalism mat kaho. Nationalism ka matlab hota hai Hitler,naziwaad. pic.twitter.com/qvibUE7mYt
— ANI (@ANI) February 20, 2020
मोहन भागवत म्हणाले की, विकसनशील देशांना त्यांचा व्यापार इतर देशात पसरवायचा आहे. त्याद्वारे ते आपल्या अटींना लागू करू इच्छित असतात. जगासमोर खूप मोठ्या समस्या असून अशात भारताने जगाचे नेतृत्व करण्याचा विचार केला पाहिजे, असे भागवत म्हणाले. देशाची एकजूट हीच खरी ताकद आहे असून त्याचा आधार वेगळा असू शकतो. पण ध्येय समानच आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू हाच एक असा शब्द आहे जो भारताला जगासमोर योग्य प्रकारे सादर करू शकतो. भले ही देशात अनके धर्म असतील, पण प्रत्येक व्यक्ती हिंदू या शब्दाशी जोडलेला आहे. हा देशच देशाच्या संस्कृतीला जगासमोर सादर करत असतो. संघात देशाच्या विस्तारासह हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढे चालणार असून तो देशाला जोडण्याचे काम करेल, असेही मोहन भागवत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, आम्ही सगळ्यांना माणुसकीसह जीवन जगायला शिकवत आहोत. त्यासाठी देशावर प्रेम असणे गरजेचे आहे. संघात आम्ही कार्यकर्त्यांना याच्याबद्दलच ज्ञान देतो.