नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमध्ये सतत नोकरीसाठी अर्ज काढण्यात येत आहेत. त्याचबरोबर लाखो उमेदवार या पदांसाठी अर्ज करीत आहेत. ज्या तरुणांना रेल्वेमध्ये करियर बनवायचे आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, रेल्वेमध्ये भरती होणार आहे. ही भरती एकूण ४,१०३ पदांवर होणार आहे, जर तुम्हाला ही नोकरी मिळवायची असेल तर आजच अर्ज करा.
वय मर्यादा-
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे निश्चित केले गेले आहे.
शैक्षणिक पात्रता-
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव- अपरेंटिस
पदाची संख्या- ४१०३
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – ९ नोव्हेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ८ डिसेंबर २०१९ (रात्री २३.२० वाजेपर्यंत)
अर्जाचे शुल्क-
एससी, एसटी, महिला, पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. बाकी उमेदवारांना १०० रुपये अर्जाचे शुल्क असेल.
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे करण्यात येईल.
अर्जाची प्रक्रिया –
उमेदवारांना आपले अर्ज वेळेत भरावे लागतील. सर्व माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज ऑनलाइन भरावा. उमेदवार या पदांसाठी https://scr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ डिसेंबर २०१९ असणार आहे.
Visit : bahujannama.com