मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील तीन दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय घेऊन महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला सहा जागा सोडण्यात आल्या आहे. अशी माहिती आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
आरपीआयला सातरा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, विदर्भातील भंडारा, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातीली पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनर या सहा जागा आरपीआयला मिळाल्या असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
माळशिरची जगा आरपीआयला सोडण्यात आल्याने या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याच निर्णय विजयसिंह मोहिते-पटील घेणार आहेत. त्यांनी माळशिरसमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांला निश्चित करावा. तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आरपीआयचे उमेदवार
फलटण – दिपकभाऊ निकाळजे
नायगाव – राजेश पवार
पाथरी – मोहन फड
मानखुर्द शिवाजीनगर – रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे
ही नावे निश्चित झाली असून माळशिरस, भंडारा या दोन जागांची नावे लवकरच जाहीर करू असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
Visit : bahujannama.com