बहुजननामा ऑनलाईन : पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने ३६ रस्ते आणि ५ मोठ्या उद्यांनांना काश्मीरचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी असा दावा केला आहे की, भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर काश्मिरी नागरिकांना पाठींबा दर्शवण्यासाठी ही नावे देण्यात आली आहेत.
भारताने ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तसेच राज्याचे विभाजन करून काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. परंतु, या निर्णयाला पाकिस्तानने विरोध केला आहे. बुझदार यांनी सांगितले की, त्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांताने आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील एक रस्ता, तसेच ५ मोठी उद्याने यांना ‘काश्मीर रोड आणि काश्मीर पार्क’ अशी नावे देण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी पाकिस्तानने त्यांचा स्वातंत्र्यदिन काश्मीर समर्थन दिवस म्हणून पाळला होता. भारताच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पाकिस्तानने चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव घेतली आहे. मात्र, जम्मू-काश्मीरबद्दलचा निर्णय हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले आहे. परंतु, जम्मू-काश्मीरबद्दलचा निर्णय हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले आहे.