मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असून राजकीय नेते एकमेंकावर टोकाची वैयक्तिक टीका करताना दिसत आहेत भाजपा सरकारमधील केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी सोमवारी २६/११च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली होती.पंजाबमधील लुधियाणा शहरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. गोयल यांच्या टीकेला दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र पोस्ट करत खास आपल्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे. यात रितेशनं पियुष गोयल यांनी केलेले आरोप खोटे आहेत . माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम मिळावे ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र, जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. सर, तुम्ही थोडा उशीर केलात. सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते. अशा प्रकारचे पत्र लिहीत रितेशनं पियुष गोयल यांना सडेतोड उत्तर दिले आहेत.
काय म्हणाले होते पियुष गोयल –
तुम्हाला २६/११ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आठवत असेल. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ज्या ओबेरॉय हॉटेलमध्ये गोळीबार सुरु होता त्या हॉटेलच्या बाहेर एका निर्मात्याला घेऊन आले होते. या निर्मात्यांच्या चित्रपटात आपला मुलगा रितेशला भुमिका मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरु होती.
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 13, 2019