यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – आंबेडकरी चळवळीत सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करीत प्रसंगी प्राणपणाला लावून स्वत:चे जीवन अर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा १० फेब्रुवारीला स्थानिक बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तसेच यवतमाळ जिल्हा नागरी सन्मान समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांच्यावतीने विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटक प्राचार्या कमलताई गवई राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम, समता सैनिक दलाचे कॅप्टन अशोक खनाडे, चंदन तेलंग, डॉ. दिलीप घावडे, इ. मो. नारनवरे, वर्धा जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे, बाळासाहेब सोनोने, बापुराव धुळे, अर्जुन लोखंडे, पी. डी. डबले आदी उपस्थित राहणार आहे. भूमिहीनांचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, नामांतराचे आंदोलन, रिडल्स, खैरलांजी घटना या चळवळीचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी कार्यकर्ते मनोगतातून विषद करणार आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यांना शाल तथा स्मृतिचिन्ह देउन सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आनंद गायकवाड, सिद्घार्थ भवरे, कवडू नगराळे, प्रा. विलास भवरे, संजय बोरकर, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, भीमराव जाभरूनकर, दीपक भवरे, रत्नपाल डोफे, राहुल सोनोने, दिलीप वाघमरे, धर्मपाल माने, प्रा. संदीप नगराळे आदींनी केले.