नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिपब्लिक टीव्ही (Republic TV) आणि अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांनी सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) दिलासा मिळू शकलेला नाही. सुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्ही विरोधातील सर्व एफआयआर (FIR) रद्द करणे आणि तपास सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. ही याचिका स्वभावत: महत्त्वकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमुर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करु नये आणि हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी आहे. मात्र ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे.
रिपब्लिक टीव्ही विरोधात सर्व एफआयआर रद्द करण्यात यावेत आणि हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्यात यावे असे याचिकेत म्हटले होते. याशिवाय संपादकीय विभागातील कोणीही, तसेच इतर कोणत्या कर्मचाऱ्याला अटक होता कामा नये, असे याचिकेत म्हटले होते.