पुणे : बहुजननामा ऑनलाइन (अविनाश कांबळे) – कोणत्याही राष्ट्राची व्यवस्था चालवण्यासाठी त्या राष्ट्राला कायद्याची नियमावली ( संविधान ) बनवावे लागते. व अशा नियमावली जगातील बहुतेक राष्ट्रांनी बनविल्याची अनेक उदा. पाहता येतील. त्यामध्ये ब्रिटिशांनी सर्वप्रथम जगाच्या पाठीवर लोकशाही राष्ट्र म्हणून जगावर अधिराज्य गाजवले. त्याच राष्ट्राने भारतावर १५० वर्षापेक्षा अधिक वर्ष राज्य केले. त्याचाच परिणाम म्हणून भारतीय लोकशाहीवर पाश्चिमात्य लोशाहीचा प्रभाव असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी भारतात राष्ट्र, राज्याच्या संकल्पना अधिक प्रमाणात प्रबळ नसल्याचे आपल्याला पाहायला मिळतात.
भारतात ६२५ पेक्षा अधिक संस्थाने असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ब्रिटिशच्या शोषणशाही विरोधात येथील जनतेने प्रखर बंड करुण भारताला १५ ऑगष्ट १९४५ रोजी स्वातंत्र्य मिळून दिल्यानंतर भारत एक प्रजासत्तक राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचालीस लागला. भारताला एक प्रबळ संविधानाच्या चौकटीत बांधण्याचे कार्य येथील घटनाकारांनी केले. त्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व प्रजासत्ताकाचा महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून २ वर्ष १७ महिने १८ दिवस संविधान पूर्ण करून भारतीयांना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी समर्पित केले. व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमलबजावणी सुरु झाली.