मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु झाले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २० वा वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी परिस्थिती शिवसेनेची सुरु आहे. एकीकडे सत्तेत असतानाही शिवसेना म्हणते की, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर, आम्ही बघून घेईन. असे म्हणतात, त्यामुळे शिवसेनेला अजूनही कळत नाही की आपण विरोधीपक्षात आहोत की सत्ताधारी पक्षात. असा टोमणा अजित पवार यांनी लगावला. यंदाच्या लोकसभेपेक्षा विधानसभेची परिस्थिती वेगळी असेल समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायचे असून अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही पवार म्हणाले.
राम मंदिराबात काय म्हणाले ?
युती सरकार हे भावनिक मुद्दे हाती घेऊन मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. शिवसेना आणि भाजप राम मंदिराचा विषय पुढे करून फक्त राजकरण करत असल्याचे अजित पवार म्हणाले.