नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमची गाडी आहे आणि रोजचे येणे-जाणे एखाद्या टोल(Toll) प्लाझावरून होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने टोल(Toll) प्लाझाचे नियम अपडेट करत मोठा बदल केला आहे. सरकारने हाय-वेवरील प्रवास सुखकर करण्यासाठी फेब्रुवारी 2021 पासून फास्ट टॅग सिस्टम अनिवार्य केली होती, ज्यामुळे टोल(Toll) प्लाझावर टॅक्स देण्यासाठी गाड्यांची गर्दी आणि लांब रांगा लागू नयेत.
काय आहे नवीन नियम –
आता सरकारने टोल प्लाझावर टोल टॅक्स वसूल करण्यासाठी एक महत्वाचा नियम केला आहे. यानुसार जर टोल प्लाझावर तुमच्या वाहनाला 100 मीटरपेक्षा जास्त मोठा जाम मिळाला किंवा तुम्हाला टॅक्स भरण्यासाठी 10 सेकंदापेक्षा जास्त वाट पहावी लागली तर तुमच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाणार नाही. या दोन्ही स्थितीमध्ये तुमच्यासाठी टोल टॅक्स फ्री केला जाईल.
हे बदल दिसून येतील –
हा नवीन नियम लागू करण्यासाठी टोल कलेक्शन पॉईंटवर पिवळी लाईन मारली जाईल, टोलच्या ठेकेदाराला निर्देश दिले जातील की, जर गाड्यांची लाईन पिवळ्या लाईनच्या पुढे गेली तर वाहन चालकांचा टोल टॅक्स घेतला जाऊ नये. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणानुसार, फास्ट टॅग अनिवार्य झाल्यानंतर बहुतांश टोल प्लाझामध्ये वाहनांकडून टोल टॅक्स घेण्याची प्रक्रिया खुप वेगवान झाली आहे, ज्यामुळे 100 मीटरची लांब लाईन लागत नाही. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या आकड्यांनुसार, टोल प्लाझावर आता 96 टक्के वाहने फास्ट टॅगनेच आपला टोल टॅक्स भरतात. तर देशातील काही टोल प्लाझावर हा आकडा 99 टक्केपर्यंत आहे.