नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेनंतर आता मोदी सरकार आणि त्यांच्या कामकाजाची पहिली परीक्षा हरियाणा आणि महाराष्ट्रात आहे. पुढील महिन्यात दोन्ही राज्यात विधानसभेची घोषणा झाली आहे. कलम ३७० हटवण्याने मोदींची प्रतिमा आणखीणच चागंली बनवली आहे. अशात विखुरलेले विरोध भाजपची वाट आणखी सुकर करत आहे. अशात विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींचा नंबर अद्याप आलेला नाही. त्यामुळे भाजप वरिष्ठांना असा विश्वास आहे की, हरियाणामध्ये मिशन ७५ आणि महाराष्ट्रात सरकार बनवण्याचं त्यांचं मिशन पूर्ण होणं जास्त अवघड नाही.
हरियाणात सत्तेत परतण्यासाठीच्या रणनीतीला अंतिम स्वरुप देण्यास सुरुवात
पीएम मोदी अमेरिकेतून परतल्यानंतर लगेचच केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात नेते आणि कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या बैठका घेतल्या आहेत. जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मेहनत करण्यासाठी सांगितले गेले आहे. कार्यकर्त्यांना मोदी सरकारच्या योजना आणि खट्टर सरकार (khattar Governement)च्या कामगिरीच्या आधारावर मतं मागण्यास सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात भाजपचा निडवणूक होमवर्क पूर्ण
महाराष्ट्रातील निवडणूक पाहता भाजपने आपला होमवर्क पूर्ण केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर प्रवास केला आहे. मराठा आरक्षणाची घोषणा करून सरकारने मराठा व्होट बँकेवरील शरद पवारांचा मक्तेदारी नियम मोडीत काढण्याची मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत तर काही होणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही विखुरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाल्याने विरोध पक्ष निवडणुकीत लढाईची अपेक्षा करत आहेत.
Visit : bahujannama.com