मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईत नाईट लाईफ हा मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रेजेक्ट 27 जानेवारीपासून मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. मुंबईतील अनिवासी जागांमध्ये हॉटेल्स, मॉल्स, दुकाने चोवीस तास सुरु राहणार आहेत. यावर राजकीय स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येताना पहायला मिळत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी यामुळे मुंबईतील रहिवाश्यांना काही त्रास झाला तर यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जाईल असे वक्तव्य केले. मंत्रीमंडळ बैठकीत या प्रोजेक्टला मान्यता दिल्यानंतर हा प्रयोग मुंबईतील काही भागामध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, नाईट लाईफवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये महिला रात्रंदिवस काम करतात. मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. अशात मुंबईतील नाईट लाईफच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कशी दिली जाणार आहे याचा विचार केला जावा. तसेच यासारखं नाईट लाईफ इतर शहरामध्ये देखील सुरु व्हावं, असे अमृता फडणवीस यांनी म्हटल आहे.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली नवी भूमिका नवा झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत हटवण्यात आलेली सुरक्षा आणि भाजप सरकारच्या काळात झालेले कथित फोन टॅपिंग प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदूत्वाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी नवी दिशा ठरवल्याने ते आता चांगल्या प्रकारे काम करतील असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
Visit : bahujannama.com