बहुजननामा ऑनलाईन टीम – मुंबई स्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेच्या अनेक गोष्टींवर निर्बंध टाकण्यात आले. याअंतर्गत खातेदार आत केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले आहे की, बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बॅंकेवर निर्बंध आणले आहे. या आदेशानुसार आत २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवीन कर्ज देऊ नये त्याचबरोबर जुन्या कर्जांचे नूतनीकरण हि करू नये, कोणतीही गुंतवणूक बँकेने करू नये, तसेच नव्या ठेवीही स्वीकारता कामा नये असे स्पष्ट मत आदेशात दिले आहेत.
यामध्ये बँकेला पत्रव्यवहार, कर्मचाऱ्यांचे पगार, कर, जागेचे भाडे, प्रिंटिंग, वीज बिल आणि स्टेशनरी तसेच कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल. मात्र प्रत्येक खटल्यामध्ये वकिलांना पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या विमा योजनेसाठी तसेच इतर काही आवश्यक खर्च करण्यासाठी बँकेला परवानगी देण्यात आली आहे. सहा महिन्यासाठी हे निर्बंध लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा ही घेतला जाईल. बँकेने प्रत्येक ठेवीदाराला या निर्बंधांची माहिती देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. रबी मिश्रा यांनी दिली आहे.
Visit : bahujannama.com