नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑनलाईन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर याच ऑनलाईन व्यवहारांमुळे फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यानुसार कॉल, एसएमएस, ई-मेल किंवा इतर माध्यमातून फ्रॉड मेसेज पाठविले जातात. त्यावर आपण जर रिप्लाय दिला तर मोठा आर्थिक भु्र्दंड होऊ शकतो. त्यामुळे आता भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशात वाढत्या ऑनलाईन व्यवहारांमुळे आरबीआयकडून वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहे. तसेच ‘आरबीआय कहता है, जाणकार बनिए सतर्क रहिए’ ही RBI ची टॅगलाईनही आहे. त्यानुसार खातेदारांना जागरुक राहण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या आहेत.
RBI ने फसवणुकीपासून वाचण्यासाठी दिल्या ‘या’ सूचना
– ग्राहकांनी आपली पर्सनल माहिती कार्ड डिटेल्स, बँक अकाउंट, पॅन किंवा आधार क्रमांक असा कोणताही डाटा कोणाशीही शेअर करू नका. कारण काही सेकंदात सायबर फ्रॉड होत असतात.
– स्कॅमर्स, बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवून तुमच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती काढून घेतात. त्यानंतर आर्थिक नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेची कोणतीही माहिती कोणलाही देऊ नका.
– KYC डिटेल्सही कोणाशी शेअर करू नका. KYC च्या नावानेही अनेक फ्रॉड झाले आहेत. या कारणानेही ग्राहकांकडून बँक डिटेल्स मागितले जातात.
– डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट नंबर, CVV किंवा OTP संबंधी फोन कॉल करुन एखाद्याकडून प्रश्न विचारले जात असतील तो फोन तातडीने डिस्कनेक्ट करा, असे केल्यास आर्थिक फटका बसण्यापासून वाचू शकतो.