नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४ ते ६ फेब्रुवारीला झालेल्या आढावा बैठकीनंतर व्याजदरात कोणताही बदल झाला नसून दरम्यान धोरणानंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत कांद्याच्या दरात कपात केली जात असल्याचे म्हटले आहे. तसेच जानेवारी ते मार्च मध्ये किंमती आणखी खाली येतील अशी अपेक्षाही आहे. पण डाळ आणि दुध यांच्या किंमतींत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचा ताण वाढतच जाईल. अर्थसंकल्पात प्राप्तिकर कपातीमुळे मागणी वाढू शकते, असेही ते म्हणाले. तसेच अल्पावधीत महागाई वाढू शकते, असे आरबीआयचे गव्हर्नर मानतात.
जानेवारी ते मार्चमध्ये महागाईत किंचित वाढ होण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला असून एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान महागाई दर ५ ते ५.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. जानेवारीत सीपीआय महागाई काय असू शकते याचा अंदाज दिला गेलेला नाही. अन्न व पेय वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, किरकोळ चलनवाढ डिसेंबरमध्ये ७.३५ टक्क्यांवर पोहोचली असून साडेपाच वर्षातील हे सर्वात अधिक आहे.
रेपो दरात कपात न केल्यामुळे गृहकर्ज दरामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. बहुतेक बँकांनी गृहकर्ज दराला रेपो दराशी जोडले असून त्यांना रेपो दरात कपात करण्याचा फायदा लवकरात लवकर मिळेल. पण यावेळी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही. देशातील सेवा क्षेत्रातील कामकाजाची वाढ जानेवारीत सात वर्षाच्या उच्चांक गाठला आहे. आयएचएस मार्केट इंडिया सर्विसेस बिजनेस ऍक्टिव्हिटी इंडेक्स जानेवारीत ५५.३ अंकांवर होता. २०१२ ते २०२० या काळातील ही सर्वोच्च पातळी असून यापूर्वी ते डिसेंबरमध्ये ५२.७ होते.