नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – चंद्रकांत खैरे यांना माझे चॅलेंज आहे. राजूर संस्थानची जमीन कुणी बळकावली हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. जर मी बळकावली असेल तर, ते कागदानिशी दाखवावे, असे आव्हान भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खैरे यांना हे ओपन चॅलेंज दिले.
राजूर संस्थानची जमीन बळकावल्याच्या आरोपाला उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले, खैरे यांनी माझे नाव घेऊन आरोप करावे. मी राजूर संस्थानचा सचिव आहे. राजूर संस्थानची जमीन कुणीही बळकावलेली नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांची बडबड सुरूच आहे. त्यांना माझे चॅलेंज आहे. संस्थानची जागा कुणी बळकावली हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. जर मी बळकावली असेल तर ते कागदानिशी दाखवावे.
शिवसेनेवरही केली टीका
शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना दानवे म्हणाले, शिवसेना आमच्यासोबत सत्तेत असताना नाईट लाइफबद्दल सेनेने मागणी केली होती. पण त्यावेळी नाईट लाईफच्या निर्णयाला आम्ही मान्यता दिली नव्हती. आता महाविकासआघाडीची सत्ता आहे. याबद्दल काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवले पाहिजे.
सरकार फार काळ चालणार नाही
तहसीलदाराला खुर्चीत बसवून कामं होत नसतात. त्यांच्याकडून कामं करून घेता आली पाहिजेत, असा टोला दानवे यांनी शिवसेनेला लगावला. तर महाविकास आघाडी सरकारव टीका करताना ते म्हणाले, हे सरकार ब्रेक सरकार आहे. अमर अकबर अॅन्थोनी असे तिघांचे मिळून बनलेले सरकार आहे. त्यामुळे हे अमर अकबर अॅन्थोनी सरकार फार कार काळ चालणार नाही.