बहुजननामा ऑनलाईन – क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) पुन्हा रवी शास्त्री यांची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ५७ वर्षीय रवि शास्त्री २०२१ टी -२० वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह ६ जणांची नावे निवडली गेली आहे, ज्यामध्ये प्रशिक्षक रवी शास्त्रीचाही समावेश होता.
Now India should mentally prepared for T20 WC defeat, then 2023 WC defeat as well.. All the best @BCCI #TeamIndiaCoach
— Manas Mallick (@manasmallick25) August 16, 2019
JUST IN – Ravi Shastri has been re-appointed head coach of the Indian men's side! pic.twitter.com/cpJOn9qtl4
— ICC (@ICC) August 16, 2019
रवी शास्त्री व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय प्रशिक्षक (माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग) यांचीही शॉर्ट-लिस्टेड यादी आहे. अखेरीस कपिल देव यांच्या नेतृत्वात सीएसीची रवी शास्त्री ही पहिली पसंती बनली. अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांनाही या समितीत समाविष्ट करण्यात आले होते. रवि शास्त्री यांचे पुन्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनणे चाहत्यांना आवडले नाही आणि त्यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली.
The CAC reappoints Mr Ravi Shastri as the Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/vLqgkyj7I2
— BCCI (@BCCI) August 16, 2019
मात्र, क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) प्रमुख कपिल देव म्हणाले की, रवी शास्त्री टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याशी विराट कोहलीच्या निवडीचा काही संबंध नाही. कपिल देव म्हणाले, ‘सर्व उमेदवारांमध्ये रवी शास्त्रीचा रेकॉर्ड उत्कृष्ट होता. ते कोच असताना भारतीय संघ कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहचला आणि ७१ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर हरविले.
The CAC reappoints Mr Ravi Shastri as the Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/vLqgkyj7I2
— BCCI (@BCCI) August 16, 2019
The CAC reappoints Mr Ravi Shastri as the Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/vLqgkyj7I2
— BCCI (@BCCI) August 16, 2019
शास्त्री यांच्या नेतृत्वात भारत आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकात त्यांना निराशा हाती लागली. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील समितीला मात्र हे एक मोठे कारण वाटले नाही. क्रिकेट सल्लागार समितीत शांता रंगस्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचादेखील समावेश होता.