मुंबई बहुजननामा ऑनलाईन – इंग्रजांविरोधात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पुकारण्यात आलेल्या भारत छोडो आंदोलनाच्या धर्तीवर ९ ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय जन आंदोलनच्या वतीने ईव्हीएम भारत छोडो आंदोलन करण्यात येणार आहे. अशी घोषणा मुंबईत राष्ट्रीय जन आंदोलनच्या वतीने घेतण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय जन आंदोलनचे निमंत्रक रवी भिलाने व फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, केंद्रात निवडून आलेल् सध्याचे भाजप सरकार हे लोकांच्या मतावर निवडून आलेले नाही. तर ते ईव्हीएम सरकार आहे. या सरकारनं ईव्हीएमबाबत केलेली चोरी उघडकिस आली आहे. त्यामुळे त्याविरोधात देशातील जन संघटना रस्त्यावर येणार आहेत.
तर ९ ऑगस्ट रोजी देशभरातील शेकडो शहरांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील चैत्यभूमी ते ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत लॉंगमार्च काढला जाणार आहे. सर्व धर्मीय मुंबईकर या दिवशी सिध्दिविनायक मंदिर, पोर्तूगीज चर्च, वरळी नाका, हाजी अली येथे लॉंग मार्चचं भव्य स्वागत करण्यात आहेत. असे धनंजय शिंदे आणि ज्योती बडेकर यांनी सांगितले.