रांची : वृत्तसंस्था – रक्ताचे नियोजन न झाल्यामुळे एका रुग्णाचे ९ दिवसांपासून उपचार थांबले होते. आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांना जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी रक्तदान करत महिलेचे उपचार केले. गुरुवारी रात्री आरोग्य मंत्री निरीक्षण करत असताना त्यांना ऑर्थो वॉर्डमध्ये शीला देवी भेटल्या. शीला यांचा पती रामविनय याने त्यांची समस्या आरोग्य मंत्र्यांना सांगितली. त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी स्वतःचे रक्तदान करतनेत्यांना रक्त दिल्यावर शीला यांचे उपचार सुरु झाले.
ब्लड बँकेतून जेव्हा रामविनय हे रक्त आणायला गेले तेव्हा रक्त घ्यायच्या बदल्यात रक्तदान करावे लागते, असे त्यांना सांगितले गेले. ते ज्येष्ठ असल्यामुळे रक्तदान करू शकले नाही. तसेच अनेक लोकांकडून मदत मागितली, पण त्यांनी मदत केली नाही.
नंतर गुरुवारी रात्री रामविनय यांच्यासोबत ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केल्यावर रामविनय यांना रक्त मिळाल्यावर त्यांच्या पत्नीचे उपचार सुरु झाले. रिम्समध्येही १५ हजार रुपयांमुळे ६७ वर्षीय मानोशी भुई यांचा उपचार रखडला होता. तेव्हाही आरोग्य मंत्र्यांनी त्यांचे उपचार फ्रीमध्ये करून देण्याचे निर्देश दिले.